फळ प्रक्रिया प्रशिक्षण

भारतामध्ये उत्पादित होणार्‍या एकूण अन्न उत्पादनांपैकी ३५ टक्के म्हणजेच जवळपास ५५००० कोटी रुपयांच्या उत्पादनाची नासाडी होते. याचे कारण म्हणजे योग्य प्रकारे साठवणूक न करणे, वाहतुकीची मर्यादित साधने, शेतमालाला व अन्न उत्पादनांना रास्त भाव न मिळणे, पदार्थांवर प्रक्रिया न करणे! भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अन्न व फळ प्रक्रिया उद्योगांना, नवीन सुरू होणार्‍या अथवा असलेल्या उद्योगात वाढ करू इच्छिणार्‍या उद्योगांना, भरीव सवलती जाहीर केलेल्या आहेत.त्यामुळेच भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय व मिटकॉनमार्फत एक महिन्यांचा अन्न फळ प्रक्रियेवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरदिवशी ५ डिसेंबरपासून सायंकाळी ६ ते ९ या वेळेत चालणार्‍या या प्रशिक्षणात, अन्न प्रक्रिया, फळ प्रक्रिया, तेलबिया प्रक्रिया, मत्स्य प्रक्रिया, सरबते, बेकरी उत्पादने, दुग्ध प्रक्रिया, फरसाण व वेफर्स, वाईन उद्योग यासारख्या उद्योग क्षेत्रातील व्यवसायाच्या उपलब्ध असलेल्या संधीची ओळख प्रशिक्षणाथर्निंा करून देण्यात येईल. व्याख्याने, केस स्टडीज, सराव, प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष भेटीवर आधारित या प्रशिक्षणात फक्त ३० जणांनाच प्रवेश दिला जाईल. प्रशिक्षणानंतर दोन वर्षांपर्यंत प्रशिक्षणार्थच्यिंा अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल. संपर्क ः ९२२३२७७३६०.

Comments